भारतीय रिझर्व बँकेकडून तीन बँकांना आर्थिक दंड लागु
फेब्रुवारी 12, 2019 भारतीय रिझर्व बँकेकडून तीन बँकांना आर्थिक दंड लागु आदेश दि. फेब्रुवारी 4, 2019 अन्वये, भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) नॉर्म्स/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) मानके आणि नोव्हेंबर 29, 2004 व मे 22, 2008 रोजीच्या परिपत्रकात विशेषतः देण्यात आलेल्या निरनिराळ्या निर्देशांचे अनुपालन न केले असल्याने खालील तीन बँकांना हे दंड लावण्यात आले आहेत.
आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे अनुपालन वरील बँकांनी केले नसल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4) (आय) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे दंड लावण्यात आले आहेत. ही कारवाई विनियमनात्मक त्रुटींवर आधारित असून, त्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या व्यवहारांशी किंवा करारांशी संबंधित नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1914 |
पेज अंतिम अपडेट तारीख: